गरुडझेप
हा लेख विशेषत: आपल्या तिसगांव गावातील माझा मित्र बळिराम (भल्या) देवरे याच्याकडे बघून मी लिहिला आहे
विद्यार्थी वाहतूक करणारा एक सर्वसामान्य वाहतूकदार म्हणून तो नाशिक मध्ये विद्यार्थी वाहतूक करतो विद्यार्थी वाहतूकीतून त्याने त्याच्या अंगी असलेल्या वाहन चालवण्याच्या कौशल्याचा आपल्या रोजगारासाठी उत्तम असा उपयोग करुन घेतला आहे गेले ७-८ वर्ष नाशिक सारख्या शहरात राहून व्यवसायाच्या नानाविध पर्यायातून विचार करुन विद्यार्थी वाहतूक सेवा हे क्षेत्र काय असते ! आणि त्यातून आपल्या जीवनाला स्थैर्य कशाप्रकारे मिळू शकते अस त्याच्याकडे बघून मला पहावयास मिळाले सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील असून सुध्दा त्याने हिम्मत न हारता नाशिक सारख्या शहरात अनेक संकटांना तोंड देत विद्यार्थी वाहतूक सेवेत आपली ओळख निर्माण केली आहे त्यातून त्याची कौटुंबिक आणि आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यात या व्यवसायाचा मोठा फायदा झाला आहे बळिराम कडे बघूनच मला वाटते
आपली जगण्याची पद्धत बदलत आहे आणि त्यानुसार नव्या गरजा निर्माण होत आहेत. त्या गरजांमधूनच अनेकानेक साधे वाटणारे परंतु चांगला पैसा मिळवून देणारे उद्योग उभे रहात आहेत. आपण थोडे डोळे उघडे ठेवून या गरजा आणि हे उद्योग पाहिले तर आपल्याला त्यातून आपल्या आवडीचा एखादा कमी भांडवली उद्योग सापडू शकतो. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये मुले स्कूल बस किंवा सामूहिकपणे कंत्राट केलेली खाजगी वाहने यातून मुले शाळांना जात होती. पण आता मुलांच्या वाहतुकीचे हे प्रश्न केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर लहान-मोठ्या सर्वच शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात महापालिका असलेल्या शहरांची संख्या २७ आहे. म्हणजे एवढी महानगरे आहेत. या महानगरांचा हा प्रश्न आहेच, परंतु अनेक मध्यम आधाराच्या शहरात आणि खेड्यात सुद्धा पालकांना ही समस्या भेडसवायला लागली आहे. मुले स्कूल बसने शाळेत जातात, मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस ही प्रत्येकाच्या दारात थांबत असते. तसेच त्या बसगाड्यांचे काही ठराविक थांबे ठरलेले असतात त्यामुळे अनेक मुलांना कमीत कमी एक-दोन फर्लांग चालत जाऊन बस पकडने सहज शक्य होते.
एकदा स्कूल बस ठरवून दिली आहे त्यामुळे मुलाच्या शाळेत जाण्याचा प्रश्न सुटला आहे असे म्हणून पालक सुटकेचा नि:श्वास टाकत असले तरी घरापासून बस शाळेपर्यंत नेऊन सोडण्यापर्यंत मनात घालमेल करावी लागते आपली पोरं सुखरुप जातील-येथील का हा प्रश्न कायम सतावत असतो विशेषत: एलकेजी, यूकेजी पासून ते चौथी-पाचवीपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्वांना घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत जाण्यापर्यंत हा प्रश्न उपस्थित होतो. मुलाचे आई आणि वडील दोघेही नोकर्या करत असतील तर मुलांना बसवर शाळेत पाठवण्यापलीकडे पर्याय नसतो शाळेत मुलाला कोणी पोहचवावे आणि कोणी आणावे हा प्रश्न कायम सतावत असतो. कारण नोकरी करणार्या आई-वडिलांना हे काम शक्य नाही आणि त्यांना स्कूल बसचे पैसे भरुन मुल शाळेत पाठवावी लागतात यातच अनेक तरुण मुलांचा स्वयंरोजगार लपलेला आहे. तेव्हा उगाच रोजगारासाठी व्यर्थ प्रयत्न करणार्या मुलांनी थोडी कल्पकता दाखवून आपल्या भागातल्या अशा पालकांशी संपर्क साधला तर त्यांना महिन्याकाठी चांगली कमाई होऊ शकते. मुंबईत आणि पुण्यामध्ये केवळ एवढ्या कामासाठी एका मुलामागे महिन्याला दोन ते तीन हजार रुपये घेतले जातात.
ही समस्या केवळ शहरांचीच आहे असे नाही. काही गावांमधून सुद्धा ती उद्भवलेली आहे. महाराष्ट्राच्या भरपूर बागायती शेती असलेल्या भागात लोक गावात न राहता शेतांवर वस्ती करून तिथे रहायला लागले आहेत. अशा लोकांची मुले सुद्धा शाळेसाठी शेतातल्या वस्तीपासून बसने शाळेत नेऊन सोडणे आणि शाळेतून घरी वस्तीपर्यंत परत आणणे ही ग्रामीण भागातल्या मुलांना एक रोजगार संधी आहे. तिचा फायदा घेऊन त्यांनी पालकांशी संपर्क साधून मुलांना सुखरूप घरी आणून सोडण्याची हमी दिली तर त्यातून एक उत्तम व्यवसाय उभा राहू शकतो. या व्यवसायासाठी थोड्याफार प्रमाणात भांडवली गुंतवणूक करावी लागते. लोन काढून स्वत:चे वाहन खरेदी करता येते विद्यार्थी वाहतूक परवाना घ्यावा लागून आपली वाहतूक सेवा चालू करता येते आणि रोजगारासाठी कोणासमोर हात पसरण्याचीही गरज नाही. लोकांची गरज ओळखून आणि धीटपणे त्यांच्याशी संपर्क साधून हा व्यवसाय मिळवता येतो. शिवाय या मुलांना सुखरूपपणे घरी आणून सोडले आणि विश्वास निर्माण केला तर व्यवसाय वाढू शकतो. अशा व्यवसायातून चांगली प्राप्ती व्हायला लागली तर मुलांची ही वाहतूक करण्यासाठी या व्यवसायात गुंतलेला तरुण स्वत:ची बस ही ठेऊ शकतो आणि त्यातून आपल्या कामाची व्याप्ती वाढवू शकतो. मात्र हा व्यवसाय उत्तम रितीने करण्यासाठी मुलांच्या शाळेत जाण्याच्या वेळा, बसच्या वेळा, शाळा सुटण्याच्या वेळा आणि बस थांब्यापर्यंत बस येण्याच्या वेळा या सगळ्या गोष्टींचे संवेदनशीलतेने भान ठेवावे लागते. शेवटी ही एक सेवा आहे आणि सेवेशी संबंधित असलेल्या व्यवसायाला भांडवलाची गरज नसली तरी अतीशय गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने व्यवसाय करणे हे आवश्यक असते. शिस्त आणि गांभीर्य या जोरावर व्यवसाय छान वाढू शकतो. शेवटी विद्यार्थी वाहतूक व्यवसायात 'गरुडझेप' घेण्याच्या बळीरामच्या प्रयत्नाना माझा सलाम
:-तुषार आहेर™
0 Comments