दुष्काळ

कसमादे पट्ट्यातील जवळ जवळ सर्वच तालुके पावसाळा आणि हिवाळ्यातच भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आपल्याजवळील जळगांव धुळे जिल्ह्यात तर मागच्या आठवडाभरातच कर्ज आणि करपलेल्या पिकांमुळे ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच कसमादे पट्टयातील ५-६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपल आहे दुष्काळाची दाहकता लक्षात येण्यासाठी हा आकडा पुरेसा आहे. निम्मा नाशिक जिल्हा  दुष्काळाच्या दारात उभा असताना सरकार कुठे आहे, असा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे. खेड्यापाड्यांत फिरून सरकारने दुष्काळाचे गांभीर्य समजून घ्यायलाच हवे!

उत्तरेकडील राज्यांत आणि नाशिक जिल्ह्यातील च पेठ सुरगाणा तालुक्यात कहर माजवणाऱ्या पावसाचे आम्ही काय घोडे मारले आहे हे कळावयास मार्ग नाही. उत्तरेला महापुराचा तडाखा देणाऱ्या पावसाने महाराष्ट्रातील आणि विशेषत: कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे अर्ध्याहून अधिक नाशिक जिल्हयावर आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग घोंगावत आहेत. निसर्गाची विसंगती अशी की,  ढगफुटी, धो-धो पाऊस यामुळे केरळ हिमाचल, उत्तराखंड, बिहार, आसाम आदी राज्यांमध्ये जलप्रलय ओढवला होता. महापुरामुळे हजारो गावे जलमय झाली होती. कावेरी  गंगा, कोसी, महानंदा यासह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत ,लाखो लोकांना बेघर केले होते. याउलट कसमादे पट्टयात पाऊसपाणी नसल्यामुळे गावकऱ्यांवर घरे सोडून जाण्याची वेळ आली आहे. एकटय़ा केरळ आणि बिहारातच पुराच्या तडाख्यामुळे ८०० लोक मृत्युमुखी पडले होते  घरे-दारे, शेतशिवारे यात पाणी घुसून भंयकर नुकसान झाले होते . जलसमाधी मिळालेल्या गावांची नेतेमंडळींकडून हवाई पाहणी वगैरे करुन पुरग्रस्तांची मलमपट्टी कयण्याचे काम जोरदार दिसून आले  . उत्तरेत भरभरून बरसणाऱ्या पावसाने कसमादे पट्ट्याला व महाराष्ट्राला मात्र हुलकावणी दिली आहे. उत्तर भारतातील राज्ये ओल्या दुष्काळाशी झुंजत असताना इकडे निम्म्याहून अधिक महाराष्ट्र कोरड्या दुष्काळाशी दोन हात करताना दिसतो आहे. अर्ध्यावर हिवाळा आला पावसाळा संपला तरी महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्हे अजूनही कोरडेठाकच आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत नाशिकजिल्ह्यातील ८ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती ओढवू शकते, असे सरकारचे म्हणणे आहे असे चित्र दिसत जरी असले तरी मात्र आँक्टोबर  महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतही पाऊस न झाल्यामुळे आणखी काही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होउन संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या सीमारेषेवर जाऊन पोहोचेल असे दिसतेय पावसाळ्याच्या उर्वरित  येत्या १० दिवसाच्या काळात

असेच अवर्षण राहिले तर

राज्यातील २५ ते ३० जिल्ह्यांना दुष्काळाचा राक्षस विळखा घालू शकतो. महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे असे आहेत की, जिथे पावसाने सरासरी ओलांडली आहे. १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे आणि राज्यातील २० जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. विदर्भात एकमेव वर्धा जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला. बाकी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे जवळपास कोरडेच आहेत. पश्चिम विदर्भातील वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि अमरावती हे जिल्हेही कोरडेठाकच आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक का होईना सरी कोसळल्या. मात्र याच विभागातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत पाऊस बेपत्ताच आहे. उत्तर महाराष्ट्रातील पेठ आणि सुरगाणा तालुक्यात समाधानकारक पाऊस असला तरी उर्वरीत नाशिक जिल्हा आणि याच विभागातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांत मात्र दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. सर्वात भयावह परिस्थिती आहे ती मराठवाड्याची. नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील खरिपाची पिके तर शेतकऱ्यांच्या हातून पूर्णतः गेली आहेत. पावसाळ्याच्या प्रारंभी आलेल्या सरींनी शेतकरी सुखावला होता. वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या पूर्ण केल्या, पण नंतर पावसाने दडीच मारली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. आता ही दुबार पेरणीही वाया गेली, अशीच परिस्थिती आहे. एकटय़ा नाशिक विभागात शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी खर्च केलेले दोन हजार कोटी रुपये वाया गेले आहेत. असा निष्कर्ष काही स्वंयसेवी संस्था करत आहेत कर्जमाफीच्या भुलभुलय्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तर यावर्षी दारात उभेच केले नाही. खासगी सावकारांकडून

उधार–उसनवार करून

शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; मात्र कुठे ४० दिवस, कुठे ५० दिवस तर कुठे ६८ दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके सुकली. आज ना उद्या पाऊस पडेल आणि सुकलेली पिके पुन्हा तरारतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. तथापि, निर्दयी बनलेल्या निसर्गाने ही आशाही फोल ठरवली. सुकलेली पिके करपून गेली. वाढ खुंटलेल्या पिकांतून हाती काहीच येणार नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकात बकऱ्या आणि जनावरे सोडली. दोन-तीन दिवसांपुर्वी कसमादे पट्ट्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र हातातून गेलेल्या कांदा तूर पिकांना जीवदान मिळेल अशी परिस्थिती आता राहिली नाही. खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांची शिवारे तर पावसाअभावी रखरखीत झाली आहेत. पेठ सुरगाणा तालुक्यांमधील पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील गिरणा धरणात पाणी आले, पण दोन महिन्यांपासून पावसाचा टिपूसही न पडल्यामुळे देवळा तालुक्यासह बहुतांश कसमादे पट्ट्याचे जणू वाळवंटच झाले आहे. देवळा, मालेगाव, सटाणा  चांदवड व नांदगाव तालुक्यातील काही गांवे ऐन  पावसाळा आणि हिवाळ्यातच भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. कसमादे परिसर आणि चांदवड नांदगाव तालुका मिळून तर मागच्या आठवडाभरातच कर्ज आणि करपलेल्या पिकांमुळे  ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळाची दाहकता लक्षात येण्यासाठी हा आकडा पुरेसा आहे. निम्मा नाशिक जिल्हा आणि विशेषत: कसमादे पट्टा दुष्काळाच्या दारात उभा असताना सरकार कुठे आहे, असा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे. माझ्यामते  खेड्यापाड्यांत फिरून सरकारने आणि प्रशासकीय यंत्रणेने दुष्काळाचे गांभीर्य समजून घ्यायलाच हवे!

:- तुषार आहेर™