शेतकरी

जरा तिखट आहे..
बघा काय डोक्यात बसतय का  ??
शेती, शेतकरी अन संप... खूप  पोस्ट आल्या अन् वाचल्या, पुढे पाठवल्या.. यातून एकच कळलं.. शेतकरी कोकणातला असो घाटावरचा असो मराठवाड्यातला असो किंवा विदर्भातला असो.. कोणाचंच फक्त शेतीवर पोट भरतंय अन् तो  सुखाने जगतोय असं कुठंच नाही.. फुल्ल पाणी असणाऱ्या कोकणात, भरपूर पाणी असणार्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा दुष्काळी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंवा विदर्भात तुम्ही कुठेही जा.. बेसिक प्रश्न तेच पाणी, वीज, बी बियाणं अन शेवटी गचाळ मार्केट... अन याचा परिपाक मरत चाललेला शेतकरी.. हा यावर चर्चा इतकीच होऊ शकते कि कोण आधी मरतोय ??? विदर्भ/मराठवाडा/उत्तर महाराष्ट्र/प.महाराष्ट्र कि कोकण...

70 वर्षात साधं पाणी अन् वीज आपन देऊ शकत नाही याची कोणत्याच राजकारण्याला लाज वाटत नाही.. अन् आम्ही सामान्य लोक फक्त बोंबलत फिरणार कि निधी कोणी कोणाचा पळवला... अहो पवार असो फडणवीस असो वा कोकणचे राणे असो.. ह्याचे धंदे कसे वाढले ??
पर्यटनावर राणेंचेच हॉटेल्स का वाढले ?
ऊस फक्त पवारांचाच नफ्यात का ?
मुंढे मॅडमच्या दारूच्या कंपनीला 24 तास पाणी.. अन् बिडमध्ये लोकांना xxx धुवायलाहि पाणी का नाही ?
अहो हे आले कि त्यांना नाव ठेवायचे अन ते आले कि ह्यांना. 60 वर्षात आपण साधं पिकांची आधारभूत किंमत ठरवू शकत नाही किंवा साधी शेतकर्याच्या जीवावर आलेलं जास्तीच धान्य मार्केट मध्ये विकायची system बनवू शकत नाही ??  अन् कसल्या मंगळावर जायच्या गप्पा हाणतो आपण ?
दूध 17 रु. लिटर अन् बिसलरी 20 हि आपली विकसित मार्कटिंग ची प्रणाली...
यावर नीट विचार करा... हे न सुटणारे प्रश्न आहेत का ओ ??
20mm पाऊस पडणारं इस्त्रायल 100% सिंचित आहे अन् 140 च्या वर पाऊस पडणारा महाराष्ट्र दुष्काळी ???
आपल्या महाराष्ट्रात इतकी कुवत नाहीय का  कि 60 वर्षात आपण एक चांगली शेतमालाची विक्री प्रणाली उभा करू शकत नाही ?? कोकणात एक आंबा export centre उभारू शकत नाही ? कांदा प्रक्रिया केंद्र उभारु शकत नाहीत ?अमूल सारखा एक "महानंदा" चा brand बनवू शकत नाही ? ज्यामुळं दुधाला भाव मिळेल?  Constructive काम अन   दीर्घकालीन नियोजित  विकास नाही का होऊ शकत शेतीचा ? अहो 34 हजार कोटीच्या कर्जमाफित आख्खा महाराष्ट्रातील नद्या जोडून होतील अन् थोडीं अजून अक्कल वापरली तर ह्या नदीजोडमध्ये उभ्या महाराष्ट्राला 24 तास पुरणारी वीज बनु शकते पण पाणी अन् वीज हे बेसिक प्रश्न सुटले तर शेतकऱ्याच्या अडचणी सुटल्या कि ओ... मग ह्या राजकारण्यांच्या दारात कशाला उभा राहतोय शेतकरी ? पण त्याचे प्रश्न सोडवायचे तर नाहीच पण त्याला कर्जमाफीची नवीन नवीन गाजर दाखवायची अन् त्याच गाजरावर मतांचं पीक काढायचं.. म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा तेच प्रश्न अन् पुन्हा शेतकऱ्याला तीच गाजरं... विचार करा.....

टीप: गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक नेत्याच्या मागे झेंडे घेऊन फिरणाऱ्या शेतकर्याच्या पोरांनी तर नक्की विचार करा.. तुमचा आजा, तुमचा बाप अन् आता तुम्ही प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते आहात.. या तीन पिढ्यात तुमचे "मार्गदर्शक", नेते" अन "युवानेते" ह्यांनी पार स्विस बॅँकेत खाती काढलीयत अन् तुम्ही अजून आज्याने काढलेलं पीककर्ज अजून "नवं-जूनं" करताय... फिरा बाबानो अजून झेंडे घेऊन फिरा.....
👆पटलं तर पाहा जमलं तर काही अंगीकारा.... नाहीतर आहेच, नेहमीच येतो तो पावसाळा 🌨