माझ गांव
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच पुर्वेकडच टोक असलेल माझं तिसगांव गांव महाराष्ट्राचे आराध्यदैवत मार्तंडभैरव खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक छोटेखानी गांव चंदनपुरीला बाणुबाईच्या भेटीस जाताना नाशिक जिल्ह्यात ज्या ठिकाणी मार्तंडभैरव खंडेरायांनी मुक्काम केला त्यात ओझर आणि तद्नंतर तिसगांव हे आमचे गांव, गांवात मार्तंडभैरव खंडेरायाचे जुन्या बांधनीचे मंदिर आहे . श्री खंडेरायाच्या मंदिरात तिसगांवचा वार्षिक जत्रोत्सव चंपाषष्ठीला होत असतो ज्यात आबालवृद्ध सर्व खंडेरायाच्या नामघोषात तल्लीन होतात जत्रेत वेगळाच आनंद हा पहायला मिळत असतो तीन दिवस चालणार्या या जत्रोत्सवाची पूर्ण गांव जणू वर्षभर वाट बघत असतात असं जत्रेच्यावेळी दिसून येते गावातील तरुणवर्ग ७० किमी दूर असलेल्या आणि पौराणिक परंपरेत महत्त्व असलेल्या दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीच्या कोपरगांव शहराजवळील पात्रातून तांब्याच्या कळशीत पाणी भरुन आणतात त्याला आमच्या कडे भक्तिभावाने गंगेच पाणी म्हणतात ते घेउन एका रात्रीत चालत येउन यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील देवी-देवतांचा त्या पाण्याने अभिषेक घालतात
हे गंगेच पाणी घेउन येण्यासाठी यावेळी तरुण वर्गात मोठी उत्सुकता दिसून येते गंगेच पाणी गावात येण्यासाठी गावाने नकळत वेळेचे बंधन घालून घेतले आहे कारण या पाणी घेउन येणाऱ्या कावडधारक तरुणाचे गावाच्या वेशीवर आगमन हे ४ वाजेच्या सुमारास च होत असते आमच्या वाडवडिलांच्या पिढ्यानपिढ्या पासून गावात देवाच्या भक्ताची परंपरा आहे आधुनिक काळात अंधश्रद्धा म्हणून जरी या परंपरेला हिणवलं जातयं तरी गावात या परंपरेला आजही आदराचे आणि श्रध्देचे स्थान देण्यात येते कावडधारक गंगेच पाणी गावात आणत त्यावेळी देवाचा अवतारी भगत त्या पवित्र गंगेच्या पाणी आणणार्या तरुणाच्या हातात असलेल्या तांब्याच्या कळशींशी नतमस्तक व्हायला येतो त्यावेळी हा भगत आणि कावडधारक यांचा भेटीचा क्षण बघण्यास गावातील लहानथोर सगळ्यांचीच गर्दी असते मग पुढे वाजत गाजत कावडधारकांची गावात मिरवणूक निघते त्यांच्या कावडधारकांकडे असलेल्या तांब्याच्या कळशींची सुहासिनी पूजा करतात देवांना त्या पाण्याने अभिषेक घालून झाल्यावर
सांयकाळ पर्यंत गावात जत्रेच्या बाबतील औत्सुक्याचे वातावरण दिसते सांयकाळीच जत्रेत गोडधोड मिठाई विकणार्या हलवाईंची दुकाने यायला लागतात लहान मुलांचे विशेष आकर्षण असलेले खेळणीवाले जे खूप दयनीय जीवन जगत असतील ते आपल्या बायका पोरांसह जत्रेत दोन पैसे मिळतील या आशेने येतात गावातील उत्साही तरुणवर्गाची संध्याकाळच्या वेळी वेगळीच लगबग दिसून येते ती म्हणजे जत्रेत येणाऱ्या भाविकांच्या स्वागताच्या बँनर फ्लेक्स लावण्याची
नंतर रात्री ८ वाजता भगताकडून जत्रा चांगली व्हावी यासाठी कौल मागितला जातो त्यावेळी देवाची वर्षांनुवर्षे भक्तिभावाने चाकरी करणारे पुजारी भगताकडे जत्रेत विघ्न न येता जत्रा चांगली होण्याचा आर्शिवाद मांगतात आणि पुढील दिवशी म्हणजे चंपाषष्ठी च्या दिवशी गावात वेगळाच आनंद दिसून येतात ऐरवी मोकळ असणारं गांव भाविकांच्या गर्दीने गजबजून गेलेल दिसून येत दिवाळी अक्षय्य तूतीयाला येतात तशा गावातील जवळ जवळ सर्वच माहेरवाशीनी आणि त्यांची पोरबाळं जत्रेला आर्वजून येतात यात्रेत सर्वत्र चैतन्याच वातावरण निर्माण होताना दिसून येत लहान मुलांची खेळणी आणि यात्रेच आकर्षण असलेल्या पाळण्यावर बसण्यासाठी धडपड दिसते तसेच आपल्या आवडीच्या वस्तू आईवडिलांकडून मिळवण्याचा हट्ट करुन रडणारी रागावणारी रुसवा करणारी गोंडस लहान मुले आपला हट्ट पुर्ण करताना दिसतात
सकाळी मार्तंडभैरव खंडेरायाच्या मंदिरात मानाच्या देवाच्या काठ्या भेटीस येत असतात त्यावेळी अलीकडे लुप्त होउ पाहत असलेल्या पारंपरिक संबळ वाद्याच्या तालावर तल्लीन होउन नाचणारे तरुण जत्रेत वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण करतात
दुपारी ४ वाजता आमच्या तिसगांव गाव परिसरातील भाविक देवाच्या भक्ताच्या वतीने मार्तंडभैरवाच्या नावाने जयघोष करत ओढल्या जाणा-या बारागाड्या ओढण्याचा
कार्यक्रम याची डोळा याची देही डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी करतात येळकोट येळकोट जय मल्हार नावाचा जयघोष करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडत असतो मग देवाच्या पादुकांची पालखीत गांवभर मिरवणूक निघत असते बारागाड्या ओढल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या भंडार्याने आपला मळवट भरुन घेताना अनेक भाविक दिसतात यावेळी यात्रेत मिठाईच्या दुकानात गोडधोड पदार्थ घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली दिसते रात्री ९वा यात्रा कमिटीतर्फे महाराष्ट्रातील पारंपारिक मनोरंजनाचे साधन लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात येत असतो त्यात आबालवृद्ध सर्वच आर्वजून उपस्थिती दाखवतात त्यातील वगनाट्य हा प्रकार वृद्ध मंडळीच्या विशेष आवडीचा असतो आणि तरुण वर्गाला आधुनिक हिंदी मराठी आणि पारंपारिक आमच्या मायबोली अहिराणी भाषेतील गाणी हे पसंद असतात यात्रेच्या पुढच्या दिवशी यात्रेत खासकरून महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो संसारापयोगी वस्तूंची खरेदी करण्याचा त्यांचा कल दिसतो दुपारी ३ वा यात्रा कमिटी आयोजित कुस्ती स्पर्धा गांवाबाहेरील मैदानात आयोजित करण्यात येते या स्पर्धेत भाग घेण्यासाठी परिसरातील आणि जिल्ह्यातील काही नामांकित कुस्ती मल्ल येत असतात त्यासाठी ५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत बक्षीसे ठेवण्यात येतात कुस्ती स्पर्धा संपल्यावर कुठलेही औपचारिकता न पाळता यात्रा समाप्त झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहर्यावरुन दिसून येते
मग संपलेल्या यात्रेनंतर मनाला काहीतरी वेगळचं वाटत असतं जणू काही ही जत्रा संपूच नये जत्रेत भेटणारे बालपणीचे मित्र नोकरी व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्य करणारे ग्रामस्थ सगळे हे या एकाक्षणी बघायला मिळतात मग मनात पुढील वर्षीच्या चंपाषष्ठीची आतुरता तयार होते आणि यात्रा समाप्तीनंतर गांव पुन्हा त्याच्या पुर्वीच्या दिनक्रमात येते ग्रामस्थ त्यांच्या शेती व्यवसायात पुन्हा मग्न होताना दिसतात.
मुळत: सह्याद्री डोंगररांगाच्या उपरांगेतील चांदवडच्या डोंगररांगाच्या पायथ्याशी निसर्गाच्या हिरव्या कोंदणात पाचू सारखे वसलेले गाव म्हणजे तिसगांव ! दर्याखोर्यातून खळखळणारी गलाठी नदी, दक्षिण-उत्तर पसरलेला सह्यकडा आणि अनेकपिढ्या गुण्यागोविंदाने राहणार्या विविध जाती-धर्मातील तिसगांवातील लोकांनी मनात आजही तेवढ्याच मोठ्या मनाने आपुलकीने स्नेहभाव आणि आध्यात्मिकता जपली आहे. नाशिक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तिसगांव ज्या शाळेची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात १९१८ साली करण्यात आली होती ज्या शाळेने आज शंभरी पूर्ण केली आहे ती शाळा आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय या शाळांच्या माध्यमातून येथील युवापिढीने शिक्षण घेत एमपीएससी वैद्यकीय अभियांत्रिकी शैक्षणिक राजकीय अशा अनेक क्षेत्रात आपल्या गावाचे नाव कोरले आहे.
श्री पावजीदादा मंदिर हे तिसगांवचे आणखी एक ग्रामदैवत. अलिकडेच या मंदिराचाही जीर्णोद्धार भाविकांच्या सहकार्याने करण्यात आला. येथील मंदिरात जिल्हा भरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत असतात येथील मंदिरात केलेला नवसपुर्ण होतो अशी भाविकांची धारणा आहे वर्षभर या मंदिर परिसरात अनेक भाविक नवसपुर्ती निमित्त कार्यक्रम करत असतात भविष्यात हे ठिकाण जिल्ह्यातील चांगले धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून पुढे येउ पाहत यानंतर आता गावचा वार्षिक जत्रोत्सव होणार्या श्री मार्तंडभैरव खंडेरायाच्या मंदिराचाही जीर्णोद्धार करावा, असा विचार पुढे आला आहे. यावेळी मंदिराचा जुना बाज कायम ठेवताना मंदिर आधुनिक शैलीचे हवे, असाही आग्रह काही भाविक-भक्तांनी घेतला आहे लोकवर्गणी करुन गावात श्री राम मंदिराचा जिर्णोध्दार केला जातोय आता स्लॅब मनभावक ५१ फुट उंचीचा कळस अशा थाटाचे सुंदर, प्रशस्त मंदिर उभे राहिले आहे. गेले तीन वर्ष मंदिराचे काम चालू होते पुढील वर्षी रामनवमीच्या दिवशी कार्यक्रम होत असून त्यावेळीच श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होत आहे. गावात श्री सप्तशृंगीदेवी, श्री कानुबाईदेवी, श्रीनवनाथ श्री मुंबादेवी, श्री आईमाउल्या,अशी प्रमुख मंदिरे आहेत. याबरोबर मारुती मंदिरही आहे. ज्याचा २०११साली गावाने लोकवर्गणीतून जिर्णोध्दार केलाय गावचे ग्रामदैवत असलेल्या आईमाउल्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्रीराम मंदिराची नूतन वास्तु नुकतीच झाली आहे.
गावातील मंदिरांचा कायापालट होताना समस्तग्रामस्थांनी प्रथम मारुती मंदिर आणि त्यानंतर श्री राम मंदिर असा प्राधान्यक्रम दिला. मागे गावात आलेल्या चक्रीवादळात गावातील प्राथमिक शाळा इमारत उध्दवस्त झाली होती तिसगांव ग्रामस्थ आणि तत्कालीन जि प बांधकाम सभापती रविंद्र बाबा देवरे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगांव इमारतही आज सुसज्ज झाली आहे. पूर्वी असलेल्या इमारतीला सुध्दा डागडूजी करण्यात आली असून त्यात एल व्ही एच विद्यालय ही शाळा भरवण्यात येते प्राथमिक शाळेला नवीन इमारतीचे कोंदण लाभले आहे आज स्लॅबची पक्की इमारत, अद्ययावत संगणक कक्ष, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये वरचढ ठरणारी प्रयोगशाळा आणि दरवर्षी क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरणारे विद्यार्थी अशा वैशिष्ट्यांनी तिसगांव जि प प्राथमिक शाळा जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवून आहे.गिरिराज
सह्याद्रीच्या कुशीत पठारीभागात गावाची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. रामवाडी पवारवाडी निमशेवडी श्रावणदेवनगर गणेशवाडी शामवाडी इंदिरानगर इ वस्त्या गावात आहेत गाव वेगवेगळ्या वस्तीत जरी विखुरलेले असले तरी गावातील लोक तिसगांव याच नावाखाली एकत्र आहेत. गावातील प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमुळे साक्षरता १०० टक्के असताना गावातील श्रीकूष्ण ग्रंथालय, तिसगांवातील वाचक रसिकांची भूक भागवत आहे. विद्यार्थी जेष्ठ मंडळीनाही गावात वेळ सत्कारणी लावण्यासाठी हे ग्रंथालय महत्त्वाची भूमिका बजावते आहे. प्रत्येक पावलावर शासनाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा गावकर्यांनी स्वतःच्या हिमतीने खूप काही उभे केले आहे. याबरोबरच गावाचे ग्रामसचिवालय, तलाठी सोसायटी कार्यालय यासाठीही चांगली इमारत असून इमारतीमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सभागृहाचीही सोय आहे.
गावात परंपरेने सलोख्याचे वातावरण कायम आहे. त्यामुळे गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळाला आहे. शासनाने तंटामुक्त अभियान राबवण्याआधीपासून गावातील वादविवाद चर्चेद्वारे मिटवले जातात. आता या परंपरेला शासनाच्या योजनेचे पाठबळ मिळाले आहे. गावाला स्वच्छतेच्या बाबतीत जिल्हास्तरीय पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मिळाला आहे गावात पोलीस यंत्रणेला क्वचित प्रसंगी तेही एखाद्या अपघात घटनेवेळी यावे लागते. गलाठीनदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गरम्य तिसगांव गावाने एकत्र येत ग्रामपंचायत सोसायटी निवडणूका बिनविरोध करण्याचाही मान मिळवला आहे स्त्री-पुरुष समानतचे वैशिष्ट्य लाभलेल्या गावात १० बचतगट सक्षमपणे कार्यरत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक शाखा म्हणून सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक मदत केली जाते. त्याचा फायदा तिसगांव गावातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास झाला आहे.
गांवाला परसुल नळपाणी नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे याबरोबरच खाजगी विहिरी, कूपनलिका यांच्या माध्यमातूनही पाण्याचा मुबलक साठा आहे. पावजीदादा मध्यम धरण प्रकल्पामुळे २००० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मात्र, सन १९५२ पासून रेंगाळलेल्या झाडी-एरंडगांव कालव्याच्या कामामुळे आणि कमी पर्जन्यमानामुळे या धरणाची सद्यस्थिती फारशी समाधानकारक नाही. जलयुक्त शिवार प्रकल्पांतर्गत गलाठीनदीवर बांधलेल्या केटीवेअर बंधार्यांच्या माध्यमातून तिसगांव ते सौदाणे पर्यंत १२ ठिकाणी पाणी साठवणूक करण्यात आली आहे. यात पावसाळ्यात मुबलक पाणी साठाही होतो
तिसगांव गावाने दुष्काळ कमी पर्जन्य अशी अनेक संकटे आणि खूप काही सोसले आहे. रोजगारासाठी राहती घरे, वडिलोपार्जित जमीनी सोडून, आपल्या गावातून दुसर्याच्या गावात जाण्याची तयारी असे मोठे मानसिक धैर्य येथील तरुणांनी दाखवले आहे. राजकीय मंडळी आणि प्रशासनाकडे या भागात उर्जित अवस्था आणू पाहणाऱ्या झाडी -एरंडगांव कालव्यासाठी येथील जनतेने कायमच पाठपुरावा केलाय प्रशासनाला पूर्ण सहकार्यही दिले आहे. मात्र, राजकीय आणि प्रशासकीय वेळकाढू धोरणामुळे ग्रामस्थांना समाधानापेक्षा मानसिक त्रासालाच जास्त सामोरे जावे लागत आहे. कालवा लवकर पूर्ण होवून देवळा मालेगाव तालुक्यातील गावे सुजलाम सुफलाम व्हावी, एवढीच रास्त अपेक्षा तिसगाववासीयांची आहे
:- तुषार मोठाभाऊ आहेर™
मु.पो.तिसगांव ता.देवळा
0 Comments