व-हाड

लग्न म्हटलं कि त्यात भाऊबंदकी नातेवाईक मित्र सर्वच आलेच लग्नसमारंभाला जाण्यासाठी नवरदेवाच्या कुटुंबाकडून सद्यपरिस्थित विविध प्रकारचे वाहने लावली जातात अलीकडे बोलरो , क्रुझर गाड्यांचा वापर हा सर्वसामान्य झालाय म्हणजे जसं जग बदलतयं तशी साधने बदलत चालली आहेत पूर्वी माझ्या लहानपणी जेव्हा मी अगदी लहान असेन जेमतेम ६-७ वर्षाचा मला अजून आठवतेय आमच्या छोट्याशा तिसगांव सारख्या गावांत जेव्हा मुख्य रस्ताही कच्चा खडी आणि मातीचा होता गावामधील बहुतांश लोकांचं जाण्यायेण्याच साधन बैलगाडी होत मध्यमवर्गीय लोकांकडे सायकली होत्या बोटावर मोजता येतील अशा लोकांकडे राजदूत आणि जावाच्या मोटारसायकली होत्या मोटारसायकल हा शब्द मला खूप उशीरा कळाला कारण गावामध्ये फटफटी हाच शब्द प्रचलित होता काही मातब्बर एक-दोन धनिक लोकांकडे ट्रँक्टर होती म्हणजे त्यावेळी ट्रँक्टर असणारी व्यक्ती ही खूप संपन्न परिस्थितील समजली जाई गावात लग्न समारंभ असला की गावातील ह्याच धनिक वर्गातील लोकांचे ट्रँक्टर हे व-हाड घेउन जाण्यासाठी असतं सर्व नातेवाईक भाऊबंदकी वरमाई आणि खुद्द नवरदेव सुध्दा या ट्रँक्टर मध्ये असायचा खूप मजा यायची म्हणजे त्याकाळी माणुसकी पुरेपुर मला दिसायची गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती लग्नसमारंभाला हजेरी लावत असे त्यामुळे व-हाड हे गच्च गर्दीने भरलेल असायचं मला लहानपणी लग्न समारंभाला जायची खूप हौस असायची पण घरातून मला लग्नाला जाण्याची परवानगी नसायची मग मी कधी - कधी हट्ट करुन आजीबरोबर व-हाडावर बसून जायचो व-हाडाच्या ट्रँक्टर वरील बाया-माणसे चेष्टामस्करी करायचे पण त्याकाळातील सामाजिक रुढी आणि परंपरा यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या महिला जेष्ठमंडळी आणि घरातील पुरुषमंडळीच्या एखाद्या कटू शब्दाला उत्तर देण्याच सामर्थ्य नसलेल्या होत्या व-हाडामध्ये महिलांचे नवरदेवाची आई म्हणजे वरमाई वरुन गाणे म्हणणे खूप भारी वाटायचे म्हणजे मला त्यावेळी सहज सोप्प आणि लयबद्द वाटणारं गाणं आज एखाद्या उत्कृष्ट कवीच्या कवितेपेक्षा चांगलं वाटतं फक्त एकच कि त्याकाळी ग्रामीण भागात विध्दता होती पण शिक्षणाच्या अभावामुळे त्यांचे लोकसाहित्य जगासमोर येऊ शकले नाही व-हाडामधील चिल्लीपिल्ली पोरं खछप मौजमस्ती करायची जास्तकरुन हौसच खूप होती लग्नाला जायची क
मी थोडामोठा झालो मग व-हाडाला ट्रक लावले जाऊ लागले ट्रकच्या टपावर बसण्यासाठी मुलांची खूपच धडपड असायची केबिनमध्ये जेष्ठ महिला तसेच लग्नघरातील काही व्यक्ती बसत असतं रस्त्याने लोंबकाळणा-या विद्युततारा चुकवण्यासाठी आणि बाभळी किंवा इतर झाडांच्या फांद्या टाकण्यासाठी ट्रक च्या टपावर बसलेल्या पोरांना खूप कसरती कराव्या लागत असतं मागे ब-यापैकी जेष्ठमंडळी बसलेली असत काळ बदलला तसा गावातील बहुतेक लोकांकडे मोटारसायकली आल्या त्यामुळे व-हाडातील गर्दी ओसरली काळाबरोबर आता पिक अप बोलरो क्रुझर अशी साधने व-हाडाला लावली जावू लागली काळबदलला पैसाभरपूर झाला पण जनसामान्य माणूसकी मात्र दिसेनाशी झाली महागडी वाहने लावून सुध्दा आता व-हाडाला लोक येत नाही आहेर लांबवून फक्त कागदावरची मणुसकी जपण्याचा प्रयत्न हा होताना दिसतो आज लोकांना लग्न टाळीच्या वेळेवर पोहचले की खूप मोठे समाजकार्य केल्यासारखे वाटते आणि वर आणि वधू पक्षाला आपण आल्याचा पुरावा म्हणून नमस्कार घालून चेह-यावर फसवे हास्य दाखवावे लागते मला माझ्या लहानपणी पाहिलेल्या लग्नसमारंभाच्या आठवणी आजही मोहून टाकतात मला कधी वाटलं नव्हतं की त्याकाळी मी जे पाहिलेलयं ते मला याकाळी दुर्मिळ होऊन जाईल जास्त काही नाही फक्त एक आठवण आली म्हणून मी लिहिलयं जे मनातं येत ते अक्षररुपी लिहिण्याचा माझा छोटाचा प्रयत्न असतो

:-तुषार आहेर™
   तिसगांव